जयश्री पांचाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला मुंबई जिल्हा उपाध्यक्षा पदी निवड
सामान्य कुटुंबातून जन्माला आपल्या जयश्री पांचाळ या स्वतः ची ओळख निर्माण करण्यासाठी झटत असताना त्यांना सामान्य महिलांच्या अडचणी, दुःख गरीबीने बेचैन केले. हेच कारण ठरले त्यांना सामाज कार्यात येणाची प्रेरणा मिळावी. ऐन तारुण्यात महिलांचा विकास या ध्येयाने त्या वेड्या झाल्या. व हेच आपले पुढील आयुष असे त्यांनी निश्चित केले. त्यावेळच्या समाजसेविका मृणालताई गोरे यांच्या सोबत महिलांचा लढा सुरु ठेवला. उपोषण, मोर्चा हे त्यांचे दिनक्रमच झाला. पण नुसते आदोलन करून चालणार नाही हे त्यांच्या लक्षात नंतर त्यांनी स्वत: औद्योगिक उत्पादक सहकार संस्था निर्माण केली. व शेकडो महिलःच्या हाताला काम दिले. गेली ३५ वर्ष त्या अविवाहीत राहून महिलांच्या विकासासाठी अविरतपणे काम करित आहेत. महिलांच्या आर्थिक अडचणी दूर करणासाठी मुंबई जिल्हा सहकारी बँकेत संचालिका म्हणून त्या निवडणू आल्यावर - महिलांसाठी शेकडो संस्था निर्माण करून आता त्या फेडरेशनच्या अध्यक्षा म्हणून काम करित आहेत.
जाहिरात
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला विभागाच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पदी त्यांची नियुक्त करण्यात आली आहे.
पक्षाच्या कार्यक्रमात मुंबई प्रदेशचे अध्यक्ष श्री समीर भुजबळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी जयश्री पांचाळ यांनी. मी तळागाळातील महिलांसाठी आयुष्यभर काम करित राहीन आणि आता तर अजित पवार साहेबांनी जी
राजकीय ताकद दिली त्याचा फायदा माझ्या कार्याला बळ निमार्ण करून देईल असे उदॄगार काढले. व अजित पवार छगन भुजबळ तसेच सर्व नेते मंडळीचे आभार मानले.
0 टिप्पण्या