मुंबई - संजय डुबल - मालाड आप्पापाडा झोपडपट्टीत येथे लागलेल्या भीषन आगीत, पाटण तालुक्यातील जवळपास 60 कुंटुंबांची घरे जळाली.
जळीतग्रस्तांना उत्पादनशुल्क मंत्री शंभुराजे देसाईंनी केली तातडीने मदत...
मालाड आप्पापाडा परिसरात लागलेल्या भीषन आगीत मुळचे पाटण तालुक्यातील जवळपास 60 चाकरमान्यांची घरे लागलेल्या आगीत जळुन खाक झाली असुन. त्यांचे सर्व घरे, संसार उपयोगी साहीत्य, जीवनावश्यक वस्तु, कपडे सर्वच्या सर्व साहीत्य जळाल्याने कुटुंबे उघड्यावर आली.
तालुक्यातीला अनेक कुटुंबांवर ओढावलेल्या प्रसंगाच गांभिर्य शंभुराजे देसाईंचे कार्यकर्ते गजानन पड्याळ यांनी शंभुराजे देसाईंच्या लक्षात आणुन देताच.
अधिवेशनात व्यस्त असतानाही विषेश लक्ष घालत सविस्तर माहीती घेऊन संबंधीताना शासकिय पातळीवर जिल्हाधिकारी तसेच संबधितांना मदती संदर्भात योग्य सुचना दिल्या.
तसेच मंत्री शंभुराज देसाईंचे कार्यकर्ते संजय जाधव, अरविंद गुजर, जगन्नाथ कदम,व स्थानिक रहिवाशी यांचे मदतीने सर्वांना रेशनिंग, स्वयंपाकाची भांडी, ब्लँकेट, कपडे इत्यादी साहीत्याचे वाटप करण्यात आलं.
0 टिप्पण्या