राज्यातील धरणांमधील जलप्रदूषण रोखा!
- आ. सत्यजीत तांबे यांची जलसंपदामंत्र्यांना विनंती
- जलसंकटातून मार्ग काढण्यासाठी केली सूचना
मुंबई- संजय डुबल - आपला महाराष्ट्र न्युज लाईव्ह -
राज्यासह देशभरात यंदा पावसाचं प्रमाण खालावलं असल्याने राज्याला गंभीर पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच राज्यातील धरणांच्या जलाशयात जलप्रदूषण होत असल्याने पाणी पुरवठ्यावरही परिणाम होतो. मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कंबर कसली आहे. जलाशयांमधील प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी आणि जलाशयांच्या आसपासच्या परिसराचा विकास करण्यासाठी ठोस धोरण तयार करावं, अशी विनंती आ. तांबे यांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्राद्वारे केली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ०७ जलाशयांमध्ये रविवारपर्यंत ९० टक्के पाणीसाठा असून, वातावरणातील बदल आणि पावसाचा जोर कमी असल्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीसारख्या मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, इतर धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठ्यासोबतच मुंबईसह अनेक शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जल प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या जल प्रदूषणामुळे वाहत येणारे पाणी सुद्धा बऱ्याचदा प्रदूषित असते. तसेच धरणांच्या आजूबाजूच्या विकास कामाच्याबाबतीत सरकारचे ठोस धोरण नसल्यामुळे धरणांच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना आरोग्यासह आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे आ. सत्यजीत तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे.
एखाद्या वर्षी पाऊस कमी पडला तर मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. तसेच धरण परिसरातील प्रदेशाच्या विकासाबाबत ठोस धोरण तयार करून जलाशयांमधील जल प्रदूषण कसे कमी होईल. याबाबत उपाययोजना करून, पुढाकार घ्यावा. तसेच आ. सत्यजीत तांबे यांचे उपक्रमाला सहकार्य असून, लोकसहभाच्या माध्यमातून या समस्या दूर होतील, असा विश्वास आ. सत्यजीत तांबे यांनी जलसंपदामंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केला.
0 टिप्पण्या