कुरुंदा येथील एल्गार सभेत बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, कायदा बनविण्यासाठी आधार लागतो असे सरकारने सांगितले होते. आता पाच हजार पुरावे सापडले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरकारने सरसकट आरक्षण दिले पाहिजे, केवळ नोंदी असणाऱ्यांनाच आरक्षण देणे आम्हाला मान्य नाही. सरकारने आता कारणे न सांगता आरक्षण द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.
आंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या वेळी राज्याचे मंत्रीमंडळ जवळ बसून होते मात्र माझी नियत ढळू दिली नाही. मला काही झाले तर मराठा समाज तुम्हा सोडणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. समाजानेही शांततेत आंदोलन करावी, जाळपोळ करू नये, आत्महत्या करु नये असे आवाहन त्यांनी मराठा समाजातील नागरीकांना केले.
0 टिप्पण्या