मुंबई - संजय डुबल -
सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्नी - शमन दलास जवळपास 4 तासाच्या शर्थीच्या प्रयत्नां नंतर यश आले आहे.
आगीत कुणीही जखमी झाल्याची किंवा अडकल्याची अद्याप माहिती मिळाली नाही.
आगीचे लोळ एवढे भयंकर होते की आकाशात धुराचे साम्राज्य पसरले होते.
आगीने रौद्र रूप धारन करत शेकडो झोपड्यांना आपल्या कवेत घेतल्या. शेकडो झोपड्या जळुन खाक झाल्झायाची भिती व्यक्त होत आहे. आगीमुळे शेकडो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत. घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते.
0 टिप्पण्या