सेवाभावी समाजिक संस्था समाजाचा खरा आधार आहेत- सर्जेराव मोहिते...
महात्मा गांधी जयंती निमित्त साक्ष फाउंडेशन तर्फे विद्यामंदिर नागांव कोल्हापूर या ठिकाणी शालेय वस्तू वाटप आणि वक्तृत्वस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला, साक्ष फाउंडेशच्या संस्थापक सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांनी विद्यार्थ्याना वह्या, पेन आणि पुरस्कार साहित्याचे वाटप केले.
संस्था करत असलेल्या या समाजसेवा कार्याचे पाहुणे आणि अध्यक्षानी कौतुक केले, समाज सेवा करणं ही आवड उपजत असावी लागते आणि समाजाचे काही देणं लागतो ही भावना जागृत असावी तेव्हाच हातून समाज हिताचं कार्य घडत असते ते काम साक्ष फाउंडेशन कडून होत असल्याचे गौरवोद्गार काढले. 
भविष्यात फाउंडेशनसाठी सर्वोतोपरी योगदान देणार असल्याचे अश्वासन मोहिते त्यांनी दिले. विद्यालयाचे मुख्याधापक यांनी फाउंडेशनच्या सेक्रेटरी स्वरांजली आठवले यांचा सत्कार करून कार्याचे कौतुक केले, प्रास्ताविक कुभार सर यांनी केले तर स्वरांजली आठवले यांनी पाहुण्यांचे आभार मानल
ADVT.
ADVT.
या वेळी कार्यक्रमासाठी,गावचे सरपंच,सौ विमल शिंदे, सदस्य संतोष पात्रे, आरपीआय तालुका अध्यक्ष अवंतिका सावंत, मिनाक्षी स्वामी, समाजसेवक अनिल शिंदे, पंचशिल तरूण मंडळ अध्यक्ष प्रविण आठवले, सचिन खांडेकर, चंदन मचले, आश्विनी भोसले, वैष्णवी मचले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या