सुहासिनी देशपांडे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले होते. मनाचा कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६),आई शप्पथ..! (२००६), चिरंजीव (२०१६) आणि धोंडी, हिरवा चुडा सुवासिनीचा, मंडळी तुमच्यासाठी काय पण, आम्ही दोघे राजा राणी, कुठं बोलू नका,गडबड घोटाळा, धग, वक्त के पहले (हिंदी), सिंघम (हिंदी) याशिवाय त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची, राजकारण गेलं चुलीत आणि सासुबाईंचं असंच असतं यांसारख्या नाटकात भूमिका साकारल्या.
रंगभूमीवरील कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना २०१५ साली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडणार आहेत.
१०० हून सिनेमात काम करणाऱ्या सुहासिनी देशपांडे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.
0 टिप्पण्या